Bakul Marathi Kavita by Spruha Joshi

SD &  Admin
0


'कुळ' गच्च पांढऱ्या फुलांनी भरलेलं सुंदर झाड. त्याच्या फुलांचा वास हा खूप सुगंधी आणि हवाहवासा वाटणारा असतो. परंतु एवढं असूनही या झाडाला कोणी किंमत देत नाही. तुम्ही बघितलं असेल, हे  झाड रस्त्याच्या मधोमध किंवा कुठेतरी रानवाटेच्या लगत दिसतात. त्यामुळे सतत ही झाडे धुळीने माकलेली असतात. त्यामुळे कदाचित लोकांना या झाडाच्या फुलांचं कौतुक नसावं.

बकुळ मराठी कविता | Bakul Marathi Kavita | कवयित्री स्पृहा जोशी

    निसर्गावर आणि मुक्या प्राण्यांवर मी खूप खूप प्रेम करतो. जर कोणी विनाकारण झाडांची तोड किंवा मुक्या प्राण्यांना त्रास देताना किंवा मारताना दिसलं की मला खूपच राग येतो. खरं तर हा राग माझ्या खूप डोक्यात जातो आणि नको ते शब्द त्या वाईट माणसांसाठी माझ्या मनात येतात. आणि म्हणून बकुल ही कविता मला अधिकच जवळची वाटते. खरं तर मला निसर्गावरच्या कविता खूपच आवडतात. आणि त्या मी आवडीने वाचत असतो.

 

Read More : द्वारका मराठी कविता | Dwarka Marathi Kavita | Prabha Ganorkar

    बकुल या कवितेत कवयित्रीने खूप छान पद्धतीने बकुल झाडाचे वर्णन केले आहे. तसेच अनेक सुंदर अलंकारांनी तिची स्तुती आणि तिचं दु:ख किती गहन आहे ते सांगितले आहे. शेवटच्या प्रत्येक ओळी मनाला चटक देणाऱ्या आहेत. वाचताना फार छान वाटत, परंतु मनाला दु:ख ही होतं की, कोणीतरी आपल्याला सुगंधित सुख देतं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तसं म्हटलं तर हा माणसाचा वाईट गुणच आहे.       .    

   कवयित्री स्पृहा जोशी  यांची बकुळ मराठी कविता | स्पृहा जोशी यांच्या कविता                            

दुधाळ झर्‍याच्या आणि हिरव्या पाऊलवाटेच्या 

मध्ये तू दिसतेस, 

थरथरत उभी असलेली ..

लोक चालत राहतात धुळीतून 

वाट होत जाते आणखी मळलेली ..


तू तशीच उभी आहेस..

थोडी मुळं हलवून इकडे तिकडे बघ तरी..

तुझ्या आसपासच्या या मळकट करडेपणात

तू किती सुंदर दिसतेयस!


मी तुला खूप वर्षं बघतेय..

आकाश निळी झालर,

पाऊस त्याची रिमझिम,

चंद्र मोतिया चांदणं देतो.

तू हलत नाहीस पण जागची..

थोडंसं मोहरल्यासारखं दाखवतेस फक्त..


पण आता इतकं बोलतोय म्हणून,

पण पलीकडे हिरवेगार डोंगर आहेत 

उसळणारा समुद्र आहे..

तुला नाही वाटत एकदा त्यांच्याकडे पहावंसं?

त्या मळक्या पाऊलवाटेवरून दूर कुठेतरी जावंसं?


ण.. तू आपली तिथेच नेहमी..

दुधाळ झर्‍याच्या आणि हिरव्या पाउलवाटेच्या मध्ये थरथरत उभी..

संध्याकाळच्या वाऱ्याची वाट पहात..

आपण आता इतकं बोलतोय म्हणून,


ण..

तुझा आणि संध्याकाळच्या वाऱ्याचा

जीव आहे ना एकमेकांवर?

मला कसं कळलं?

अगं, संध्याकाळचे दुखरे होऊन 

इतके घमघमता न दोघेही.. 

आपल्यालाच वाटतं की जातायेता माणसं पहात नसतात..

आपण आता इतकं बोलतोय म्हणून,

पण अशी दुखरी गुपितं फार काळ लपत नसतात...


                                            कवयित्री - स्पृहा जोशी



या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला बकुल कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Bakul poem published in this blog is by Poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!